Header Ads Widget

Responsive Advertisement

खाकीवर्दीतील माणुसकीला पाझर फुटल्याशिवाय वर्दीतील माणूस कसा राहील याचाच एक जिवंत दृश्य

ए एक वेळ आवश्य ऐका....

परळी //कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सुरू असलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे परळी शहरातील अनाथ बेसहारा वयोवृद्ध सध्या
रस्त्याच्या बाजूलाच आपले अस्तित्व जोपासत आहेत. पण जगण्यासाठी त्यांना अन्न व पाण्याची आवश्यकता असते ती मात्र या कर्फ्यु च्या काळात मिळत नसल्याने त्यां लोकांना अन्न पाण्या वाचून उपाशी पोटी दिवसदिवस  राहावे  लागत आहे. परळी शहरातपेट्रोलिंग करत असतांना पोलीस कर्मचाऱ्याना असे गोरगरिब वयोवृद्ध ठिकठिकाणी  दिसून येत आहेत अश्यावेळी खाकीवर्दीतील माणुसकीला पाझर फुटल्याशिवाय वर्दीतील माणूस कसा राहील याचाच एक जिवंत उदा आज गुरुवार रोजी परळीतील संभाजीनगर पोलीस कर्मचाऱ्यांनी अश्या लोकांना एक वेळच जेवण पुरवत कोरोनाला हद्दपार करीत आपण या ही लोकांचे प्राण निश्चित वाचवू शकू आशा उद्देशाने संचारबंदीची कर्तव्य पुर्ण करत माणूस म्हणून  माणुसकीच्या कर्तव्य  ही तितकेच महत्त्वाचे आहे  असा संदेश यातून स्पष्ट होत आहे.

Post a Comment

0 Comments