Header Ads Widget

Responsive Advertisement

▪ ढाब्यावरील वेटरने महिलेजवळील दागिने लुटून खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा; दहा हजार रुपयांचा दंड


अंबाजोगाई // दुध व दही विक्रीसाठी निघालेल्या महिलेवर ढाब्यावरील वेटरने पाळत ठेऊन शेतातील पाउल वाटेत तिला अडवून साडीच्या पदराने गळा आवळून डोक्यात लाकडाने मारहाण करून उसामध्ये फरफटत नेले व महिलेच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिने लुटून खून केल्याप्रकरणी रेणापूर येथील तरुणास दोषी ठरवत जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व दहा हजाराचा दंड न्या. अनिल सुब्रमण्यम यांनी सुनावला. सदरील घटना ७ जानेवारी २०१५ रोजीच्या सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान घडली होती. यामुळे परळी तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती.

▪ युक्तिवाद ऐकताच आरोपीने हातकडीसह पळण्याचा प्रयत्न :

दादाहारी वडगाव येथील महिलेची लूट व खून प्रकरणात आज निकाल हाती लागणार असल्याने लातूरच्या कारागृहातील आरोपी बसने अंबाजोगाईकडे आणला होता. बसमध्ये बसल्यानंतर त्याच्या खिशातील करवतीने दोरी कापली होती व खिशामध्ये चटणीची पूड देखील आढळून आली. सदरील खून प्रकरणाचा युक्तिवाद ऐकताच आरोपीने न्यायालय परिसरातून पळ काढला. मात्र, पोलिसांनी मोठ्या शिताफीने शिवाजी चौकातच त्याच्या मुसक्या आवळल्या. या झटापटीत बंदोबस्तासाठी असलेले पोलीस देखील किरकोळ जखमी झाले.


परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव येथील मीनाबाई माणिक मुंडे (वय ५५) यांचा दही व दुध विक्रीचा व्यवसाय होता. दररोजच्या नित्यनेमाप्रमाणे ७ जानेवारी २०१५ रोजी सकाळी ७ वाजता सदरील महिला दादाहारी वडगाव कंपवर टोपल्यात दही व दुधाचे कॅण्ड ठेऊन पाउलवाटेने निघाली होती. वाटेत दोन्ही बाजूने उसाची लागवड केल्यामुळे ही घटना कोणाच्याही लक्षात आली नाही. सदरील महिला उसाच्या आत गेल्यानंतर दादाहारी वडगाव येथील सोळंके नामक ढाब्यावरील शंकर विठ्ठल खारे या वेटरने पाळत ठेऊन महिलेचा पाठलाग करून तिच्या साडीच्या पदराने पाठीमागून गळा आवळला व ढाब्यावरील भट्टीसाठी आणलेल्या लाकडाने तिच्या डोक्यात वार केले. महिला बेशुद्ध पडल्याचे लक्षात येताच आरोपीने या महिलेला उसाच्या फडात फरफटत नेले. महिलेच्या गळ्यातील ४० तोळ्याचे वाळे, कानातील सोन्याची टॉप, दोन डोरले, २६ तोळे चांदीच्या पाटल्या, मनी मंगळसूत्र असा एकूण ३३ हजारांचा ऐवज लुटत महिलेला जीवे मारले. सदरील महिला दुध व दही विक्री करून परत न आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरु केली. तरीदेखील महिला मिळून न आल्याने पती माणिक मुंडे यांनी परळी ग्रामीण पोलिसात पत्नी गायब झाल्याची तक्रार दिली. यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक व्ही.ए. पल्लेवाड यांनी आसपास शोध सुरु केला. दादाहरी वडगाव कॅम्पकडे जाणाऱ्या पाउलवाटे लगत असलेल्या सोळंके यांच्या ढाब्यावर चौकशी सुरु केली. यात रेणापूर येथील शंकर विठ्ठल खारे हा वेटर गायब असल्याचे समजले. यानंतर ढाबा मालकास सदरील गायब असलेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी रेणापूर गाठले. तिथे त्याच्या राहत्या घरी आरोपी आढळून आला. पोलीस पाहताच बिथरलेल्या अवस्थेत आरोपी दिसल्याने पोलिसांना त्याच्याबद्दल संशय बळावला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच या घटनेतील मुद्देमाल त्याने पोलिसांना दिला. या प्रकरणाचा अधिक तपास करून दोषारोपपत्र येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकारणाची सुनावणी न्या. अनिल सुब्रमण्यम यांच्यासमोर झाली. सरकार पक्षाच्या वतीने दहा साक्षीदार तपासण्यात आले. साक्ष पुरावा होत असताना आरोपीकडून जप्त केलेले दागिने, घटनास्थळावर आरोपीची उपस्थिती दर्शविणारा साक्षीदार, तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्वपूर्ण ठरल्या. वरील युक्तिवाद व साक्ष ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्या. अनिल सुब्रमण्यम यांनी आरोपीस कलम ३०२ भा.दं.वि. प्रमाणे जन्मठेप व १० हजारांचा दंड तर कलम ३९२ (जबरी चोरी) अन्वये तीन वर्षाची शिक्षा व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाच्या वतीने ॲड. लक्ष्मण फड यांनी काम पहिले. त्यांना ॲड. दिलीप चौधरी, ॲड. एन.डी. शिंदे, पैरवी अधिकारी म्हणून जी.पी. कदम यांनी सहकार्य केले. या निकालाकडे संपूर्ण परळी तालुक्याचे लक्ष लागले होते.


▪ सालगड्याच्या माहितीवरून लागला आरोपीचा सुगावा
मीनाबाई मुंडे या दादाहारी वडगाव कॅम्पकडे दही व दुध विक्रीसाठी नेहमीप्रमाणे दोन्ही उसाच्या मध्यभागी असलेल्या पाऊलवाटेने जात असल्याचे सालगड्याने पहिले. घटनेच्या अर्ध्या तासानंतर आरोपी दागिन्याचे गाठोडे घेऊन त्याच पाऊलवाटेने परत आल्याचे त्याने पहिले होते. सदरील महिलेचा शोधाशोध सुरु झाल्यानंतर त्या सालगड्याने नातेवाईकांना ढाब्यावरील वेटरला य पाऊलवाटेवर पाहिल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांचा तपास सुकर झाला.

Post a Comment

0 Comments